हरमनप्रीत नाही तर या दोन खेळाडूंमुळे भारताने सामना गमावला, मॅचचा खरा टर्निंग पॉइंट पाहा...Click here
INDW vs AUSW : भारताचा सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरमुळे पराभव पत्करावा लागला, असे म्हटले जात होते. पण ती बाद झाल्यावरही भारताच्या हातात हा सामना होता. पण फक्त दोन खेळाडूंच्या चुकांमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. हे दोन खेळाडू आहेत तरी कोण आणि या मॅचचा टर्निंग पॉइंट नेमका आहे तरी काय जाणून घ्या...
केप टाऊन : कर्णधार हरमनप्रीत कौर बाद झाली आणि त्यानंतर भारताने सामना गमावला, असे म्हटले जात होते. हरमनप्रीत बाद होणं, हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला, असेही म्हटले जात होते. पण हरमनप्रीत बाद झाल्यावर दोन खेळाडूंमुळे भारताला सामना गमवावा लागला, असे आता समोर आले आहे. भारताच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट नेमका काय होता, हे आता समोर आले आहे.
अकराव्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या ब्राउनने आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. हा चेंडू कीपरच्या डोक्यावरून टोलविण्याची चूक जेमिमाने केली. यात तिच्या बॅटची कड लागून चेंडू कीपरच्या हातात विसावला. यामुळे जेमिमा खूप निराश झाली. तिने २४ चेंडूंत सहा चौकारांसह ४३ धावा केल्या. यानंतर हरमनप्रीत कौरने रिचा घोषच्या साथीने मोर्चा सांभाळला. कौरने सलग दोन चौकार मारून अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात हरमनप्रीत धावबाद झाली. हरमनप्रीत कौरची बॅट खेळपट्टीत अडकली अन् ती धावबाद झाली. त्यामुळे तिने मैदान सोडताना निराशा व्यक्त केली. तिने बॅटच भिरकावली. आजारी असतानाही मैदानात उतरलेल्या हरमनप्रीतने ३४ चेंडूंत सहा चौकार व एका षटकारासह ५२ धावा केल्या.
अखेरच्या ३० चेंडूंत भारताला ३९ धावांची गरज होती. या वेळी पाच विकेट हातात होत्या. दीप्ती शर्मा आणि रिचा घोषकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, भारतीय महिलांना पुन्हा एकदा 'फिनिशिंग टच' देण्यात अपयश आले. रिचा घोष, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, राधा यादव, शिखा पांडे यांना मोठे फटके मारता आले नाहीत आणि भारताला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. जेव्हा भारताला ३० चेंडूंत ३९ धावा करायच्या होत्या, तेव्हा भारताच्या हातात सामना होता. पण त्याचवेळी दीप्ती शर्मासारखी अष्टपैलू खेळाडू लवकर बाद झाली आणि भारताचा मोठा धक्का बसला. त्यानंतर रिचा घोषकडून भारताला मोठ्या अपेक्षा होत्या. अखेरच्या २ षटकांपर्यंतही भारताला जिंकण्याची संधी होती. रिचा या विश्वचषकात भन्नाट फॉर्मात होती. पण ती यावेळी अपयशी ठरली. जेव्हा भारताला ३० चेंडूंत ३९ धावा करायच्या होत्या, ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी होती. पण त्या करता आल्या नाहीत आणि तोच या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. यावेळी दीप्ती शर्मा आणि रिचा घोष या दोघींमुळे हा सामना गमवावा लागला, असे आता स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे हरमनप्रीत नाही तर या दोघींमुळे भारताने सामना गमावला.